आत्माराम आणि अमृतानुभव हे अनुक्रमे रामदासस्वामी आणि ज्ञानेश्वर यांनी लिहिलेल्या दासबोध आणि ज्ञानेश्वरी नंतरचे परमोच्चप्रतीचे ग्रंथ.
परंतु सामान्य माणसांना दासबोध आणि ज्ञानेश्वरी हेच माहीत आहेत. आणि असावे देखील. अर्थात ‘एक तरी ओवी अनुभवावी’, हा ज्ञानेश्वरीतील प्रचिती यावा हा आहे.
परंतू ज्यांनी या धर्मग्रंथांना एका अर्थाने जगायचे काम केले. किंवा त्याचा प्रसार-प्रचार करून त्याची अनुभूती इतरांना मिळावी यांसाठी प्रयत्न केला. त्यांनीच जर त्याच्या विपरीत वर्तन केले तर…
एक सज्जन व्यक्ती, संत, महंत, कुटुंब प्रमुख म्हणून हानी आहेच. तसेच समाजाचे ही अतोनात नुकसान आहे.
लाख मरो पण लाखोंचा पोशिंदा जगो, ही म्हण नकळत पण मागे पडत चालली आहे.
काही वर्षांपूर्वी भय्यूजी महाराजांनी केलेली आत्महत्या आणि आता शिरीषमहाराज यांनी केलेली आत्महत्या, या दोन्ही याच प्रकारे वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर घोर नुकसान करणाऱ्या होत्या.
समाजमाला या मुळे एक मोठा खड्डा पडला. ज्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहायचे त्यांनीच अपेक्षा भंग केला. नव्हे मित्र, नातेवाईक यांच्याकडे मन मोकळे करण्याची तसदी नाही घेतली, म्हणून एक टोकाचा निर्णय घेतला गेला.
खरेतर आपल्या हिंदू संस्कृती मधे आत्महत्या हा प्रकारच नव्हता. परकीय आत्याचाऱ्याच्या काळातही शील रक्षण व्हावे म्हणून करवा लागणारा आत्मत्याग, आत्मरक्षण, देहत्याग होता. तसेच साधू संतांनी तर आत्मत्यागाचे अनेक सुंदर उदाहरणे प्रस्थापित केलीलेली आहेत.
एका विशिष्ट वयानंतर जेंव्हा आता थांबले पाहिजे असे वाटते तेंव्हा देहत्याग करण्याचा शास्त्रीय, आध्यत्माच्या मार्गाने जाणाऱ्या अवस्था आहेत. आत्मत्याग करण्याचा मार्ग अत्यंत खडतर असा असतो.
जीवनाची केवळ आसक्ती संपली आहे असे नव्हे तर जीवन कार्य आता पूर्ण झाले आहे आणि आपण हा देह त्याग केला पाहिजे, या भावनेने आत्मत्याग केला जातो. अर्थात त्याला प्रचंड आत्मविश्वास लागतो, धाडस लागते.
या विपरीत आत्महत्येला केवळ अविचार आणि आतातायी निर्णय लागतो.
प्रायोपवेषन किंवा संथारा ही आत्मत्यागची अन्य नावे. आजही अनेक जैन साधुसंत किंवा ज्येष्ठ व्यक्ती संथारा घेतात. त्यावेळी त्यांचे दर्शन घ्यायला जाणारे समाजबांधव हे हजारोंच्या संख्येने असतात.
कारण आत्मत्याग करत असताना दिवसागणिक एका एका अन्न पदार्थांचा त्याग करावा लागतो. सुरुवातीचे काही दिवस एक वेळेसचेब जेवन सोडून देणे. नंतर त्यातूनही अर्धे जेवण करणे. पुढेपुढे जाऊन पूर्ण जेवण सोडून केवळ एक वेळेस दूध घेणे. आणि अगदी शेवटी पाण्याचाही त्याग करणे.
या सगळ्या अवस्थामधून जात असताना प्रचंड इच्छाशक्ती लागते. आणि ती योग किंवा साधनेशिवाय प्राप्त होऊ शकत नाही.
ज्ञानेश्वरांनी घेतलेली संजीवन समाधी तर या सगळ्यांची परमोच्च अवस्था होती.
म्हणून प्रत्येक वेळी आत्मचिंतन हा एकच विषय शेवटी शिल्लक राहतो. ध्येय आणि स्वप्नांचा पाठलाग करत असताना निखळ कौटुंबिक आनंद हे देखील केवळ आपले कर्तव्यच महिन्यात जीवनात अनेक ध्येयासोबतीचे एका अर्थाने पहिल्या क्रमांकाचे ध्येय आहे, हे उमगले तर खचित कौटुंबिक साधना कामाला आली असे म्हणता येईल.
आणि सामान्य माणसाचा प्रवास देखील आत्मानंद पर्यंत पोहंचेल या शंका नाही.