तो तिला कविता अर्पण करणार होता.
मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.
त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.
या ‘अपूर्ण’तेच्या भावनेने त्याच्या कवितेची अवीट गोडी वाढत गेली.
तो तिला कविता अर्पण करणार होता.
मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.
त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.
या ‘अपूर्ण’तेच्या भावनेने त्याच्या कवितेची अवीट गोडी वाढत गेली.
तो तिला कविता अर्पण करणार होता.
मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.
त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.
मग त्याने स्वतःला अर्पण केले.
तेंव्हा ‘प्रतिभे’चा सवतीमत्सर जागा झाला होता.
तो तिला कविता अर्पण करणार होता.
मग त्याने संपूर्ण काव्यच अर्पण केले.
त्याला तरीही काहीतरी शिल्लक राहिल्याचा भास होत होता.
मग त्याने स्वतःला अर्पण केले.
तेंव्हा त्याची कविता ‘प्रतिभे’ने ओतप्रोत भरून वाहत होती.
तो शास्त्रज्ञ म्हणून परग्रहावरील जीव सृष्टीचा शोध घेत होता. तर त्याच्या पत्नीच्या पीएचडीचा विषय जीवनमूल्यांशी संबंधित होता.
अनेक वर्षांतरही दोघांचे संशोधन
अजून पूर्ण झालेले नाही.
खचित त्यांना कळून चुकले आहे, आपण जीव लावणे थांबवले तर संशोधन निश्चितच अपूर्ण राहील.
तो एक ‘अंध विद्यालय’ चालायचा.
त्याने कधीही रंगांची काळजी केली नाही.
त्याच्या डोळंस देशाला जाणीव झाली होती, ‘प्रेमाच्या रंगापूढे सर्व काही फिके आहे’.
तो तिच्यासाठी गजरा घेत होता.
परंतू फुलारीने त्याला अत्यंत निर्दयीपणे गजरा काढून दिला.
त्याला क्षणभर वाटले, ‘फुलांच्या व्यापाऱ्याला प्रेम शिकवावे’
परंतू तो व्यवहाराने वागला,
त्याने फुलारीला चुरगळलेल्या फुलांचे देखील पैसे दिले.
“खरतरं गुणी पत्नी ही पुरुषाचे सौभाग्य असते”, तो बोलत होता आणि ती शांतपणे ऐकत होता.
एक क्षणी त्यालाच रडू कोसळले.
तेंव्हा तिने त्याला कुशीत घेतले.
त्याच्या कविमनाने विचार केला, ‘पुरुषाला पूर्णपुरुष होण्यासाठी साधना करावी लागते. स्त्री मात्र मातृ रूपात सर्वच साध्य करते.’
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...