तिला लहानपणी वाटायचे, ‘आपल्याला पंख असते तर जगभर फिरून आले असते’.
पुढे मोठं झाल्यावर तिने पर्यटनाची आवड तर जपली. परंतु त्या सोबत एक संस्था देखील स्थापन केली.
नाव ठेवले ‘पंख’.
ती कोणत्याही मुलीचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही, या साठी काम करायची.
तिला लहानपणी वाटायचे, ‘आपल्याला पंख असते तर जगभर फिरून आले असते’.
पुढे मोठं झाल्यावर तिने पर्यटनाची आवड तर जपली. परंतु त्या सोबत एक संस्था देखील स्थापन केली.
नाव ठेवले ‘पंख’.
ती कोणत्याही मुलीचे स्वप्न अपूर्ण राहणार नाही, या साठी काम करायची.
प्रेमात असतांना…
ती बोलायची. तो ऐकायचा.
लग्नानंतर…
ती बोलत असते. तो ऐकत असतो.
व्याकरणाचा काळ बदलला तरी तो बदलला नाही, असे नाही.
तर त्याने लग्नानंतरही त्याच्यातील प्रियकर जिवंत ठेवला आहे.
मंदिराच्या ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला.
या वेळी एका ठिकाणी रामकथा सुरू होती. कथाकार विषय मांडत होते, “रामाचा वनवास संपला म्हणजे रामराज्य आले असे नाही…”
एव्हाना भक्तगण रामराज्यातील ‘नागरी कर्तव्या’चा विचार करायला लागले होते.
ती त्याला बाहेरगावी कामानिमित्त जातांना फाटकापर्यंत सोडायला जाऊ लागली.
त्याची आई दारातच थांबली.
म्हणाली, “आता इथून मागे वळून पाहायचे नाही.”
ती त्याला वाटिलावून लगोलग घरात आली. आणि सासूला बिलगली.
म्हणाली, “काहीही झाले तरी त्याच्यावर पहिला अधिकार तुमचाच…”
तो समाजात घडणाऱ्या वाईट घटनांना सकारात्मक रूप देत कथा लिखाण करत असे. प्रत्येकाला त्याच्या कथा आवडायच्या.
एकदा त्याला वाटले, ‘आपण आहे तसे कथानक रंगवावे.’.
मग त्यांने कथा लिहिली ‘समाजमन’.
आता तो केवळ टीकेचा धनी झाला आहे.
लग्नानंतर ती त्याला बाहेरगावी कामानिमित्त जातांना बाहेरपर्यंत सोडायला येऊ लागली.
त्याने एकदा-दोनदा मागे वळून पाहिले, आई काही दारात दिसली नाही.
‘पोटचा गोळा’, असा सहज हस्तांतरित करण्याची कला केवळ स्त्रियांकडेच असू शकते, या गोष्टीचा त्याला अनुभव आला होता.
एका पक्षाला जनतेने पुन्हा एकदा निवडणुकीत एक हाती सत्ता स्थापन करण्याची संधी दिली.
त्यावर विरोधकांनी आत्मचिंतन बैठक बोलावली.
परंतू दोष कोणाला किंवा कशाला द्यायचा याचा काही निर्णय होऊ शकला नाही.
त्यावेळी नेते मांडली मोठ्या आशेने पक्ष्याध्यक्षांकडे पाहत राहिले.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...