Monday, 28 April 2025

अलक ५१८

तिच्या इटुकल्या लाडोबाला परीक्षेत अगदीच सर्व साधारण गुण मिळाले.

ती तरी देखील त्याच्या आवडीचा काजूपेढा घेऊन घरी गेली.

ती ‘यश म्हणजेच सर्व काही नसतं’, हे त्याच्या बालमनावर बिंबवत होती.

Friday, 25 April 2025

अलक ५१७

 पहलगाममध्ये पर्यटकांना धर्म विचारून जीवनीशी मारले,

तरीही ‘आतंकवादाला धर्म नसतो’,

हे विधान सर्व राजकीय नेते मंडळी करत होती.

तेंव्हा एका विचारवंताने विधान केले,

‘केवळ हिंदुच धर्मनिरपेक्ष असू शकतो’, हे समजायला किती वर्ष लागणार माहीत नाही.

Wednesday, 23 April 2025

अलक ५१६

 तिने नुकतीच धर्मपत्नी होऊन नव्या संसाराला सुरुवात केली होती. तर काही दिवसांच्या आंतच तिच्या पतीची धर्मांध आतंकवाद्यांनी हत्या केली.

आता तिला अधर्म काय आहे, हे कळले होते.

आणि म्हणूनच की काय तिने धर्मनिरपेक्षतेचा बुरखा घातलेल्या संविधानाला दाद मागायची नाही, हे ठरवले.

Monday, 14 April 2025

आता कसे जायचे मामाच्या गावाला?


मामाच्या गावाकडे आगिनगाडी कधीच नव्हती. मामा गावातच राहायचा. पण मामाकडे जाण्याची मजा काही औरच होती. मामा सगळे लाड पुरवायचा. त्यामुळे सुट्ट्या लागण्याची तर वाट पाहिली जायचीच. शिवाय मामाकडे जाण्याचे इतरही काहीतरी कारण शोधले जायचे.

परंतु आता मामा नाहीये. त्यामुळे मामाच्या गावाला जावूया हे गीत आठवणे देखील असह्य झाले आहे. ऐन तारुण्यात देवाने मामाला स्वत:कडे बोलावून घेतले. भाच्यांची हौस मौज पळवून नेली. भाच्यांना धक्का बसला आहे. प्रसंगी समजत देखील नाहीये. हसणारा, धम्माल दंगा मस्ती करणारा मामा असा अचानक दूरच्या गावाला कसा काय निघून गेला?


खचित, असेही वाटत असेल, सगळेजणं खोटं बोलताहेत, मामा दूर गेला म्हणून. बहुदा मामा कामात असेल. आत्ता तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागणार आहेत. मामा असे नाही करणार. आमचे लाड न पुरवता मामा कधीच कुठे गेला नाही.

मग आत्ताच कसा काय लपून बसला आहे?


कदाचित देवच दुष्ट असणार. त्याने त्याला लप‌ले आहे, परंतु आता परत आणण्याचाही मार्ग नाहीये.

कोवळ्यावयांतील मामा विषयाच्या आठवणी किती नाजूक प्रेमळ आणि मायाळू असतात. आईनंतर मावशी असते, असे म्हणतात. परंतु मामाही असतो हे सांगायचे बहुदा बरेच कवी विसरले आहेत. तरी एका कवीने 'मामाच्या गावाला जावूया...' हे गीत लिहून मामाची थोरवी खूप सुंदरपणे, समर्पकपणे वर्णन केली आहे.


कदाचित मावशी भाच्यांना लहानपणी नक्कीच लागते. पण मामा मात्र आयुष्यभर लागतो. लहाणपणी भाच्यांना जपणारा, जीव लावणारा मामा ते आयुष्यभर पाठीशी उभा रहाणारा मामा.

बघा ना! आपली परंपरा किती महान आहे, जीवाचे रान करून मुलांना वाढवणाऱ्या बाबांना मुलाच्या, मुलीच्या लग्नात पाठीशी उभे रहायचा अधिकार नाहीये. तो हक्क मामाला दिला आहे. स्वाभाविकच आहे, प्रसंगी बाबा कठोर होऊ शकतात परंतु मामा नाही. मुळात ‘माय’ प्रमाणे मामाच्या नावातही ‘माया’च आहे. तो आई सारखे लाडही करेल आणि बाबासारखा पाठिशीही उभा राहील.


परंतू आता पाठीशी कोण उभे राहणार? पाठीवर बसायचेही राहून गेले.

देव दयाळू आहे, असे अनेकदा ऐकल्याचे जाणवते. परंतु ऐन तारुण्यात मामाला स्वतःकडे बोलवणाऱ्या देवा बद्दल कमी बोलायचे?

पण देव निष्ठूर ही नाहीये, स्वत: सगळीकडे पोहचू शकत नाही म्हणून त्याने जशी आई निर्मिली, तसेच प्रेमळ आणि मायाळू मामाची निर्मितीही त्याचीच ना!


कदाचित सगळ्या जगाला प्रेम वाटलता वाटता देवाची झोळी रिकामी होत असणार, म्हणून त्याने स्वतःला माया लावणारा कुणीतरी पाहिजे म्हणून मामाला स्वतःकडे बोलवले असणार.


आता भाच्यांनी मामाच्या आठवणीतच जगायचे, हे नक्की आहे. परंतु देवाने असे हे अकाली कोणाला नेणे थांबवावे.

मामाचे ओस पडलेले गाव, आता कसे आणि कधी सावरणार, देवालाच

ठाऊक!

————————


स्व. मयूर यज्ञेश्वर पाठक (वय-३० वर्ष)

माझ्या मुलांचा मामा, यांस भावपूर्ण श्रद्धांजली.

Tuesday, 1 April 2025

अलक ५१५


त्याला मोकळा भात आवडायचा तर तिला  अस्सट.

इटुकल्या संसारात अशा खूप वेगवेगळ्या गोष्टी होत होत्या.

तरीही संसार सुखाचा झाला.

एकमेकांची स्वभावभिन्नता जपत प्रेम करता येतं, हा नवा अध्याय ते रचत होते.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...