Sunday, 31 December 2023

अलक

 "पार्टी आनंदसाजरा करण्यासाठी करायची असते", ती त्याला म्हणाली.

"नाही", तो तिला थांबवत म्हणाला, "आपल्या आनंदात मित्रांना सहभागी करण्यासाठी."


"दोन्ही एकच", ती. 


"नाही", त्याने परत तिला थांबवले. म्हणाला,

"दुःखाच्या दिवसात सोबत केलेले बरेचदा आनंदाच्या दिवसात विसरले जात असतात."

अलक

 त्याच्या तापटपणामुळे ती त्रस्त झाली होती.

घटस्फोट हा एकच पर्याय राहिला होता.


मग तिने नवा मार्ग स्वीकारला.


पत्नीम्हणून प्रयत्न करून झाले होते,

तिने मैत्रीण म्हणून सोबत करायचे ठरवले.

अलक

 त्याला कमी वयात बढती मिळाली.

तो आता एमडी झाला होता.

आजवरच्या आयुष्यात काय काय कमावलं याचा तो विचार करत आनंदून गेला होता.


परंतू लगेचच तो शांत झाला.


त्याला गमावलेली गोष्ट आठवली.


त्याची आई आठवली.

Sunday, 17 December 2023

अलक


त्याला व्याख्याता व्हायचे होते. पण संसाराच्या रहाटगाडग्यात अडकला.

आपलं वक्तृत्व केवळ पोटभरण्याइतपतच राहतय याचं त्याला अतीव दुःख झालं.

मग त्याने वृत्ती, प्रवृत्ती आणि निवृत्तीची अनुभूती घेण्यास सुरुवात केली.



अलक


‘शाळा सुटली पाटी फुटली….’, म्हणत घरी जायचे लहानपणीचे दिवस आठवून ती अधिक भावविभोर झाली.

कारणही तसेच होते.

वडील उच्चशिक्षणासाठी तिला परगावी पाठवण्यासाठी तयार नव्हते.



अलक


‘शाळा सुटली पाटी फुटली….’, म्हणत घरी जायचे लहानपणीचे दिवस आठवून ती अधिक भावविभोर झाली.

कारणही तसेच होते.

वडील उच्चशिक्षणासाठी तिला परगावी पाठवण्यासाठी तयार नव्हते.


नि मग त्याच्या लक्षात आले शेजारधर्म असाच पाळायचा असतो.

Sunday, 10 December 2023

अलक

 

दोघांचा कलेचा संसार.

रंगदेवतेला साक्षी ठेवून सुरु झालेला संसार न्यायदेवतेच्या दारी पोहंचला.

आपली चूक होते आहे, हे लक्षात येताच त्याने तिची क्षमा मागितली. 

नि रंगदेवतेसमोर नवीन नाटक घेऊन सादर झाला, 'कोर्टाची पायरी'. 

अलक


दोघांचा कलेचा संसार. 

दोघेही अभिजात. दोघेही जातिवंत. दोघेही समर्पित. दोघेही शतगुणी.

ही दोघांची गोष्ट नाहीच मुळी.

दोघेही एकजीव कलावंत, साक्षात 'अर्धनारीनटेश्वर'.

अलक


दोघांचा कलेचा संसार. 

दोघांना जसे जसे पूरस्कार मिळत गेले तसा तसा त्यांचा अहंकार वाढत गेला नि तिची जबाबदारीची जाणीव.

त्याच्यातील 'अहं' कमी करण्याच्या प्रयत्नात तिने त्याला केवळ जाणीव करून दिली, 'आपल्या कलेच्या संसाराला 'निखळ आनंद' हेच आपत्य हवे आहे.'


Sunday, 3 December 2023

अलक


दोघांचा कलेचा संसार. 

गोघांना जसे जसे पुरस्कार मिळत गेले. तसा तसा त्याचा अहंकार वाढत गेला नि तिची जबाबदारीची जाणीव. 

तिच्यातील 'मी' कमी करण्याच्या प्रयत्नात तिने त्याला केवळ जाणीव करून दिली. 

'आपल्या कलेच्या संसाराला केवळ 'निखळ आनंद' हेच आपत्य हवे आहे.'

Sunday, 5 November 2023

खोलवर रुजलेली भक्ती



घटस्थापनेचा दिवस होता. घरातील सर्व पूजा-अर्चेची तयारी झाली होती. 

देवीचे घट बसणार होते. तितक्यात आई म्हणाली, "रात्रीच्या स्वयंपाकातील थोडे अन्न शिल्लक आहे, ते आधी कोणा गरजूला देऊन ये". मी लगेच निघालो. घरापासून अगदीच हाकेच्या अंतरावर देवीचे मंदिर होते, तिथे पोहोचलो. 


काहीजण तिथे भिक्षा घेण्यासाठी बसले होतो.  मी त्यातील एका आजी जवळ गेलो आणि म्हणालो, "आजी, काल रात्रीची थोडी भाजी-पोळी आहे. तुम्हाला दिली तर चालेल का?"

त्यावर आजी अगदी शांत स्वरात कदाचित मला समजावत म्हणाल्या, “पोरा, नवरात्र सुरू झालेत. मला, नऊ दिवस उपवास असतो मला”.


क्षणभरासाठी मी जागेवर थिजून गेलो. कदाचित एका भ्रमिक  कल्पनेत जगत होतो, ‘पोटभरलेलेच लोक उपास-तापास करतात’. परंतु आजींनी माझा भ्रमाचा भोपळा फोडला.


 आजींकडे पाहिल्यानंतर जाणवले, हे लोक देवभोळे नक्कीच नाहीत. उलट खरी भक्ती हेच तर अनुभवत आहेत. अन्यथा अंगावर नेसलेले अत्यंत मळकट जीर्ण होत आलेलं लुगड, कोणताही दागिना असायचा तर प्रश्नच नाही, जवळ एखादी मोठी पिशवी वा ततसदृश्य वैभवाचे नाही परंतु किमान सुख समाधानाचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. बहुदा देवाने आठराविश्व दारिद्र पदरात पडले होते.

तरी देखील या गोष्टीचा लवलेशही दिसत नव्हता की, आजी आता देवीकडे खूप काही मागणार आहेत.

किंबहुना देवीचे उपवास करताना देवीकडे आजवर न मिळालेल्या गोष्टींची देखील तक्रार नसणार.


सुकृतदर्शनी माणसाचा चेहरा नेहमीच बोलत असतो. परंतु आजींच्या चेहऱ्यावर निखळ शांतता होती. खंत खचित होती ती केवळ एकच की, आणलेले अन्न घेतले असते, परंतु देवीचा उपवासाला नाही चालणार ना! 


संस्कृती,संस्कृती म्हणून उदघोषणा करणाऱ्या, तिच्या संरक्षण,संवर्धन  संगोपन करणाऱ्या समाजसुधारकांचे बहुदा देवीच्या दारात नवरात्रीचे उपवास करत प्रत्यक्ष 'संस्कृतीने' सभा थाटली आहे, बहुदा पहिले गेले नसावे.


कुण्याश्या महापुरुषाने सांगून ठेवले आहे, जोपर्यंत सर्वसामान्य माणसांच्या हृदयातील श्रद्धा लोप पावणार नाही, तोपर्यंत आपली संस्कृती अमर आहे.


घरी गेल्यानंतर मला आंघोळ-पांघोळ  करून घट बसवायचे होते. देवघराची सारी आरास उभारायची होती, परंतु देवीची प्रत्यक्ष इच्छा काही वेगळीच असणार,  ज्या अनुषंगाने प्रत्यक्ष षोडशोपचार, पूजा सुरू करण्याआधी देवीने मला श्रद्धेची प्रचिती दिली होती. अन्न वाया जाणार नाही, या गोष्टीची आता मनात खंत नव्हती. शिवाय अन्य कुणा गरजूला विचारायचे धाडस देखील नव्हते.


आजींना नमस्कार केला. घरी निघालो. देवीचा जागर बहुधा माझ्या मनात सुरू झाला होता.

Sunday, 29 October 2023

अलक

 

‘डबा खाल्ला का? चहा केव्हा घेतला? कंपनीत केव्हा पोहंचलात? आता कुठे आहात? एव्हढा उशीर का?’

 - असे दिवसभरात, ती त्याला किमान पाच-सहा तरी फोन करायची.

परंतू तो प्रचंड संयमी असायचा.

एके दिवशी तो तिला म्हणाला,

“प्रेमाच्या अतिरेकाने त्रास झाला, अश्या जोडप्याचे उदाहरण आपण आपल्या मुलांसमोर ठेवलेले आवडेल का?”

अलक

 त्याची घरी येण्याची वेळ निश्चित असायची, परंतू तिचा एक फोन यायचाच. “केव्हा पोहंचताय”, असे म्हणून.

एके दिवशी काहीतरी वाटून ती त्याची क्षमा मागत होती.

त्यावर तो तिला म्हणाला,

“मला मुळीच त्रास होत नाही. उलट घरी कुणीतरी वाट पाहतंय, या जवाबदारीने लवकर पोहंचायचा प्रयत्न करत असतो.”




अलक


हॉस्पिटलमध्ये तिला नाईटड्यूटी मिळाली होती. 

तो तिला दोन-तीन तरी व्हिडीओकॉल करायचा.

तिच्या सगळे लक्षात येत होते.

पण एकेदिवशी न राहवून ती त्याला म्हणाली, 

“काळजी प्रेमाचा पाया असतो तर शंका अविश्वासाचा.” 

त्यानंतर मात्र त्याने तिला कधी साधाफोनही केला नाही.




Sunday, 22 October 2023

अलक




.

त्याने सदैव त्याच्या मुलावर बंधने घातलीपरंतु मुलीवर कधीही नाही.

मोठेपणी या गोष्टीची जाणीव झाल्यावर मुलगी म्हणाली, “बाबातुम्ही असा बंधनाचा फरक का केला?”

उत्तरादाखल तो म्हणाला, “बाळापुरुषाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ होण्यासाठी आयुष्य खर्ची पाडावे लागतेपरंतु स्त्री जन्मजात ‘दुर्गा’ असतेम्हणून केवळ जाणीव करून देणेही पुरेसे असते.”


.

देवीचे दर्शन घेऊन तिने कुटुंबासाठी ‘धन,धान्यसुखसमृद्धी’ मागितली

मुलगी तिला म्हणाली, “आईतू स्वतःसाठी कधी काही मागितले आहेस का?”

होय,” स्मितहास्य करत ती म्हणाली, “समृद्ध आईपण.”


.

तिच्या नऊदिवसाच्या उपवासाचा उपहास केला जात होता.

उपेक्षा सहन  होऊन उत्तरादाखल ती म्हणाली,

तुमच्या प्रत्येकाच्या घराचा उंबरठा शिल्लक आहेतो याच कारणास्तव”.

Sunday, 8 October 2023

अलक


(*’अलक’मधील नवीन प्रयोग सादर करत आहे. आपला प्रतिसाद आणि सूचना यांच्या प्रतिक्षेत.* )


१.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

त्याने लगोलग मुलांना बोलावून संपत्तीची वाटणी केली.

कोपऱ्यात बसून ती सर्व काही पाहत होती.

तिचा हात हातात घेत तो म्हणाला, “मी मुलांना सगळंकाही दिलेले आहे.”


२.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

अजून कर्तृत्वाचा काळ तसा शिल्लक होता.

परंतु त्याने निवृत्ती जाहीर केली.

आता लोक त्याचा ‘आख्यायिका’ म्हणून संदर्भ देत असतात.


३.

लांबत जाणारी आपली सावली पाहून तो चिंताक्रांत झाला.

सूर्यास्त समीप आला आहे, हे त्याने जाणले.

नि पुढच्याच क्षणी त्याने प्रारब्ध, प्राक्तन यांचा विचार सोडून प्रयत्न, प्रवास यावर भर देण्यास सुरुवात केली.


Sunday, 1 October 2023

अलक

 

अवतरण चिन्ह.

त्याने त्याच्या आत्मचरित्राला नाव दिले.

प्रकाशनानंतर काही दिवसातच विक्रमी खप झाला.

त्याच्या पुस्तकावर समीक्षा प्रसिद्ध झाली.

शिर्षक होते, “मी.परफेक्शनिस्ट.”

अलक

 

मादी कासव तिच्या नवजात अर्भकाची भूक डोळ्यांतून भागवते, हे कळल्यानंतर तो प्रचंड भावविभोर झाला.

नि लगोलग त्याच्या ‘विशेष मुला’ला बोर्डिंग स्कूल मधून नेहमीसाठीच घरी आणण्यासाठी निघून गेला

अलक



प्रबोधन हा त्याचा आवडीचा विषय. आणि उत्कृष्ट वक्तृत्वातून तो ते नेहमीच साध्य करायचा.

पुढे चालून त्याने एक सेवाभावी संस्था सुरू केली.

“वक्तृत्व सोडून सेवाकार्याकडे का वळले?”, 

या प्रश्नाचे उत्तर देताना तो म्हणाला,

“आधुनिकयुगाचा नवा मंत्र जपायचा यत्न करतो आहे. ‘मरावे परी कार्य रूपी उरावे’”.



Tuesday, 26 September 2023

अलक

 

त्याने त्याच्या इटुकल्या लाडोकरिता उंदीरमामावरती एक आरती रचली.

ती तिला प्रचंड आवडली.

नि आता तो मुलीच्या आनंदासाठी वस्तू विरहित गोष्टींचा शोध करू लागला आहे.

Monday, 25 September 2023

अलक

 


बाप्पांच्या मिरवणुकीत ती खूप नाचली.

लग्नानंतरचा हा पहिला मोठा सण होता.

नि त्याने संकल्प केला, ‘ती भान हरपून काम करेल, अशा तिच्या सगळ्या गोष्टी जपायच्या.’

Sunday, 24 September 2023

अलक




गणेशोत्सवातील सामाजिक प्रबोधनासाठी व्याख्यानाची परंपरा शंभर वर्षांनंतर आजही एका गणेश मंडळाने सुरू ठेवली आहे.

“श्रोते खूपच कमी असतात”, एका गणेश भक्ताने खंत व्यक्त केली.

त्यावर मंडळाचे ज्येष्ठ अध्यक्ष म्हणाले, “अनुकूलतेतील आव्हाने’, हा पुढील वर्षीच्या एका याख्यानाचा विषय ठेऊया”

Tuesday, 19 September 2023

अलक


‘मानसिक गुलामगिरी’ या विषयावर . एक पथनाट्य लिहून द्या, असे एका सामाजिक संस्थेने त्याला सांगितले.

अवघे १० मिनिंटांचे पथनाट्य लिहायला त्याला एक वर्ष लागले.

तोवर तो ‘मनाच्या श्लोकां’चा अर्थ जगण्याचा प्रयत्न करत होता.


Monday, 18 September 2023

अलक

 कर्ज म्हणजे आर्थिक गुलामगिरी’, त्याने नुकतीच नोकरी लागलेल्या मुलाला कान मंत्र दिला.

नि पहिल्यपगारात महागडा मोबाईल ईएमआई वर घेण्याचा निर्णय सोडून दिला.

सर्वसामान्यवर्गात जीवन जगताना आजच्या काळात आपली पुढची पिढी ‘आर्थिक स्वलंबन’ पाळु शकते, याचा त्याला खूप आनंद झाला.

Sunday, 17 September 2023

अलक


 त्याला स्वातंत्र्याचा अर्थ त्याच्या मुलाला समजावून सांगायचा होता.

पण प्रत्यक्ष अनुभव देण्याचा मार्ग सुचत नव्हता.

मग त्याने मुलाला एकदा स्वैराचार करायची संधी दिली.

Sunday, 3 September 2023

'मिली-जुली संस्कृती?'


शेवटच्या परकीय गुलामगिरीतून मुक्त होऊन एव्हाना आपल्याला ७६ वर्षांचा कालावधी उलटून गेला. आणि त्याचा स्वातंत्र्य उत्सव देखील आपण मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला. सर्वच जाती-पंथ-संप्रदाय या साऱ्यांच्या सीमा उल्लंघून आपण स्वातंत्र्य उत्सव खूप उत्साहात साजरा केला. इंग्रंजांचे राज्य असो वा गेल्या १००० वर्षात आजपर्यंत आपल्यावर अनेक परकीय आक्रमकानी सत्ता्ता गाजवल्या. परंतु तरीही आपण आपली हिन्दु संस्कृती टिकवून ठेवली आहे.

'ग्रीक, युनान, मिस्रा सब मिट गये जहासे, कुछ बात है कि हस्ती मिटती नही हमारी...' या प्रसिद्ध ओळी आपल्याला माहित आहेतच. अर्थात ती 'कुछबात' म्हणजे काही खूप मोठी गुप्त अवस्था किंवा गुपित अशी गोष्ट निश्चितच नाही. भारतीय साधु-संतांनी जगाला दिलेली ती एक वैश्विक देण आहे. 

सहिष्णुता, अतिथी देवो भव, वसुधैव कुटुम्बकम, माता भुमी पुत्रोहं पृथिव्या, यासारख्या अनेक जीवनमूल्यंवर आपली संस्कृती टिकून आहे. आणि अर्थातच ही टिकवण्याचं काम पिढ्यान पिढ्या साधु-संतांनी ज्याप्रमाणे केलं. तसंच सामान्य माणसांनी गृहस्थाश्रमाचे पालन करत असताना मोठ्या प्रमाणात ही जीवनमूल्य जपली. म्हणूनच आपली हिंदूसंस्कृती अनादी काळापासून टिकून आहे आणि ती अनादी काळापर्यंत टिकुन राहील, हा देखील विश्वास आहेच.

शिवाय सहिष्णुता म्हणत असताना जगभरात जेंव्हा अन्य देशातील नागरिकांवर अत्याचार आणि अनाचार होत होते.  त्यावेळेला भारतानेच जगातील अशा अनेक लोकांना आश्रय दिलेला आहे. येहुदी, पारसी ही त्यातील सगळ्यात मोठी उदाहरणे. केवळ आश्रयच दिला असे नाही तर त्यांना त्यांच्या उपासना पद्धतीचे पालन करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देखील दिले. अर्थात एक हिंदू म्हणून आपण आपले जीवनमूल्यच जपत होतो. 

आणि असे यहुदी, पारसी स्वतःचे पंथ संप्रदाय आणि देवी देवतांचे पूजन करत असताना आपल्या संस्कृतीत केव्हा मिसळून गेले हे कळाले देखील नाही. परंतु 'राष्ट्रीय काँग्रेस' आणि 'मुस्लिम लीग'च्या स्थापनेनंतर मात्र एक नवीन संकल्पना रुजवण्याचा प्रयत्न केला गेला.  ती संकल्पना म्हणजेच 'मिली-जुली संस्कृती'.

इंग्रजांच्या 'फोडा आणि राज्य करा' या धोरणाचे आपण बळी पडलो.  'मिली-जुली संस्कृती' अर्थात भारत हा एक मिश्र अशा संस्कृतीचा देश आहे, हे आपल्या मनावर बिंबवण्यात आले. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. परंतु त्यांच्या विविधतेत एकता नाही. तर एकतेत वैविध्य आहे. आणि म्हणूनच आजवरच्या हजारो वर्षांच्या आक्रमणामध्ये स्वतःचे अस्तित्व टिकवणाऱ्या देशाला काही वर्षांच्या कालावधीमध्येच 'मिली-जुली संस्कृती' म्हणून संबोधले जाते, ही एक अत्यंत विकृत मांडणी आहे. 

खरे तर गंगा उगमापासून सागराला मिळेपर्यंत गंगाच असते. गंगेच्या प्रवाहामध्ये गंगेला अनेक नद्या येऊन मिळतात.  भागीरथी, अलकनंदा, यमुना, घागरा, गोमती, शोण या सगळ्या नद्या गंगेच्या मुख्य प्रवाहामध्ये समाविष्ट होतात.  आणि गंगामय होऊन सागराला मिळतात.  गंगा ही शेवटपर्यंत गंगाच राहते.  तद्वतच हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आहे. वेगवेगळया पूजा उपासना पध्दती असल्या तरी हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदूच आहेत. आणि ही हिंदू संस्कृती अशा सर्वांचीच आहे. 


खरे तर 'सहिष्णुता' हा शब्दच भारताने जगाला दिला.  तीच सहिष्णुता आता भारताला इतर देश  शिकवू पाहतात हीच मोठी आश्चर्याची बाब आहे. आज भारतामध्ये बोलल्या जाणाऱ्या या सगळ्या गोष्टी आपण अमेरिका, चीन, जपान आदी प्रगत देशांमधून बोलू देखील शकत नाहीत. परंतु भारतामध्ये सगळ्याच गोष्टींचा मतांचा आदर करत असल्यामुळे की काय आपण ते देखील स्वीकारतो.  आणि नकळतपणे कुठे ने कुठेतरी स्वतःला हरवून  घेतो. 

परंतु आता राजकीय आणि अशा तथाकथित लोकांना देखील या गोष्टीची जाणीव होत आहेत की आपले पूर्वज देखील हिंदूच होते. याचं राजकीय उदाहरण म्हणजे गुलाम-नबी आजाद. त्यांनी देखील मान्य केले आहे की, 'अनेक वर्षांपूर्वी आमचे पूर्वज हे हिंदूच होते'. अर्थातच हिंदुस्थानात राहणारे सगळे हिंदू आहेत आणि म्हणूनच हिंदुस्थानात राहणारा कुणीही 'अल्पसंख्य' नाही. 

हिंदू संस्कृती ही एक आदर्श जीवनमूल्य जपणारी एक आदर्श अशी जीवनशैली आहे, असा स्पष्ट उल्लेख सर्वोच्च न्यायालयानेच केला आहे. त्यामुळे हिंदू जीवनमूल्य जपणे, वृद्धिंगत करणे हे समग्र मानव जातीच्या हिताचे आहे. जीवनमूल्य या गोष्टीचा उल्लेख अनेक वेळेला उल्लेख झाला, त्याचा समारोप करत असताना उदाहरण सांगायचे झाले तर ते म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांचे सांगता येईल. वडिलांनी आईला दिलेले वचन पाळण्यासाठी पुत्र १४ वर्षांचा वनवास  स्वीकारतो. आणि दुसरीकडे सत्ता मिळवण्यासाठी भावाची हत्या करुन वडिलांना तुरुंगात टाकून आपण स्वतः राजा होणारा औरंगजेब, अशी जीवनमूल्य जगणारे आपल्या संस्कृतीचा भाग होऊच शकत नाही.
तर जगाला शांती शिकवणारे भगवान बुद्ध, अहिंसा शिकणारे भगवान महावीर, धर्म रक्षणार्थ सर्वस्वाचे बलिदान करणारे समस्त शिख गुरु, नि भक्तीचा झेंडा जगभर नेणारी समस्त संत महंत मंडळी, अशी अनेक जीवन मूल्य जगाला देणारी हिंदू संस्कृती 'मिली-जुली' असू शकत नाही.  
ती हिंदू संस्कृती होती आणि हिंदू संस्कृतीचं राहील.

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


Sunday, 13 August 2023

अलक

 ‘शून्य सावली’चा दिवस त्याच्या मुलाला खूप आवडला.

तो म्हणाला, “बाबा ‘शून्य वजना’चा दिवसही असतो का?”

विषय टाळत त्याचे बाबा निघून गेले.

नि पुटपुटले, ‘प्रत्यकाने जिवंतपणी ‘शून्य अस्तित्व दिवस’ही असू शकतो याचा विचार करून कार्य केले पाहिजे’.

अलक

 एका प्रसिद्ध कलावंताने कर्जाचा प्रचंड मोठा डोंगर झाल्यानंतर आत्महत्या केली.

तत्पश्चात पत्नीने सगळी संपत्ती विकून आणि विम्याच्या आलेल्या रकमेतून कर्ज फेडले.

आता ती शासन दरबारी चकरा मारत आहे, ‘शालेय शिक्षणात ‘आर्थिक साक्षरता’ विषयाचा समावेश व्हावा म्हणून’.

अलक


एका मोठ्या साहित्यिकाया निधनानंतर त्यांच्या विषयी उलटसुलट चर्चा सुरू झाली.

त्यावर एक वाचक म्हणाला, “ ते ‘पोकळीच वाक्य’ या साठीच असतं असे वाटतं”.





Sunday, 6 August 2023

अलक


त्याच्या उच्चशिक्षित मुलाने संन्यासी होण्याचा निर्णय जाहीर केला.

त्याच्या पाया खालची जणू जमीनच सरकली.

तो स्वतःला नि पत्नीला सांभाळत म्हणाला, “हा आंनदाचा क्षण आहे. ‘ ‘संस्कार’ नुसता बोलण्याचा विषय नसून आचरणाचा भाग आहे’, हे तो सिद्ध करण्यासाठी जात आहे.”


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

अलक

 वडिलांचा एव्हढा धाक होता की, त्यांनी हाक मारली की तो ‘आलो’ म्हणत त्यांच्या समोर उभा ठाकायचा.

आता ही सवय त्याने देखील त्याच्या मुलांना लावली आहे.

‘आज्ञाधारकतेपेक्षा देखील आदर महत्त्वाचा’, हा जून्या पिढीचा संदेश, तो नव्यपिढीकडे हस्तांतरित करतो आहे.


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

अलक


फिरतीची नोकरी करताना तो बाहेर पडताना प्रत्येक वेळी आई वडिलांच्या पाया पडायचा.

कळत्या वयात आलेल्या त्याच्या मुलाने एकदा त्याला विचारले, “बाबा, तू नेहमीच बाहेरगावी जात असतोस. मग प्रत्येकवेळीच त्यांच्या आशीर्वादाची गरज असते का?”

“होय”, तो उत्तर देत म्हणाला, “आशीर्वाद. पण तो त्यांची अधिकाधिक सेवा करता यावी म्हणून.”


©️हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. ९५९५९६९९८९

Sunday, 30 July 2023

निष्क्रिय माणसे

 


'माणसाला काम नि बाईला स्वयंपाक चुकला की, संसार मोडलाच म्हणून समजा', असं लहानपणी थोरामोठ्या मंडळींकडून ऐकायला मिळालंआणि त्यानंतर आजूबाजूचं सातत्याने निरीक्षण सुरू झालं. अनेक सुखी संसार जसे दिसायला लागले तशीच अनेक निष्क्रिय माणसे देखील दिसायला लागली.

 एक काळ असा देखील होता की, ज्या वेळेला तुलनेने रोजगार निर्मिती कमी होती. त्यामुळे बेरोजगारीच प्रमाण अधिक होतं. परंतु जसा जसा काळ उलटत गेला  तसं तसं पाहायला मिळालं की, रोजगाराची कमतरता आता राहिली नाही, बेरोजगारी नाही आहे, तर बेकारी अधिक वाढली आहेे. अर्थात चांगलं शिक्षण घेऊन निष्क्रिय असणाऱ्या माणसांची वाढ होत चाललेली आहे.

 दहावी आणि बारावीच्या वेळेला अनेक वेळेला 'स्कोप' हा शब्द मोठ्या प्रमाणामध्ये ऐकायला मिळालाअमुक एका क्षेत्रामध्ये काम केलं  तरच वैयक्तिक आयुष्य अधिक सुखा समाधानाने जगता येईल, असं ऐकलेलं चांगलाच आठवतं. मला दहावी झाल्यानंतर पॉलिटेक्निकसाठी सिव्हिलला ऍडमिशन घ्यायचे होतेपरंतु त्यावेळेस अनेक जणांनी नकार दिला. कारण काय तर एकंदरीतच सिव्हिल खूपच  शिथिल झालेलं क्षेत्र होतं.

त्यामुळे अशा कार्यक्षेत्रांचा शोध त्यावेळेला घेतला जायचा की, जेणेकरून त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नोकरी म्हणा किंवा व्यवसायामध्ये परतावा मिळेल.  म्हणून 'स्कोप' शब्दाचा 'बायस्कोप' अधिक मोठा होता. परंतु आताचे जग हे सुपरसुपर स्पेशालिटीचेे झाले आहेकिंबहुना 'स्कोप' शब्द आता कालबाह्य झाला आहे. कारण ज्या क्षेत्रात आपण काम करू त्या क्षेत्रात आपण स्कोप निर्माण करू असं आताच जग झालेला आहे.

या ठिकाणी दृष्टांत आमच्या गावचा वसमतचा देता येईल. साधारण एक दहा एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, एका महिलेने आपला काजूचा वसमत सारख्या ठिकाणहून एव्हढा मोठा केला की, प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन कौतुक केले.

परंतु दुःखाची बाब आजही तीच आहे की, एकीकडे उच्च शिक्षण घेऊन विद्यार्थी तरुण तयार होत आहेतपरंतु दुसरीकडे कुठल्याही प्रकारची नोकरी अथवा व्यवसाय करता घरात बसून राहणे आणि बापजाद्यांच्या कमाईवरती जीवन जगणे, याला नकळतपणे प्राधान्य देताना पाहायला मिळतं. त्यांच्याकडे अशा प्रकारे आपण काही कार्य करू शकतो, असा दृष्टिकोन नाहीहा आळस, निष्क्रियता या गोष्टीने आपण आपलं भावी आयुष्य संकटात टाकतोय, बहुदा हा जीवनाचा दृष्टिकोन अशा उच्चशिक्षितांकडे पाहायला मिळत नाही.

कदाचित संसार म्हणून आपलं पुढचं आयुष्य कसे असेल याचेही चित्रच त्यांच्या डोळ्यापुढे रंगवलं गेलेलं नाही.

स्वतःच्या आनंदाचं काम मिळालं नसेल असं खरं तर सुरुवातीला या सगळ्या निष्क्रिय तरुणांकडे पाहत असताना वाटायचं. पण नंतर नंतर लक्षात आलं की, यांनी  कधीतरी 'कामाचा आनंद' तरी मिळवला असेल का?

 कारण जगभरातील महान लोकांची देखील आपल्याला उदाहरण देता येतील की, ज्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं स्वप्न अवतारीत करायचं होतं. परंतु आयुष्य त्यांना वेगळ्या दिशेला घेऊन गेलंआणि ज्या दिशेला घेऊन गेलं त्या दिशेलाही त्यांनी जग तोंडात बोट घालेल, एवढं महान कार्य असं करून दाखवलंं.

पूर्व राष्ट्रपती मा.अब्दुल कलाम यांना नाही का पायलट व्हायचं होतं. सचिन तेंडुलकरला फास्ट बॉलर व्हायचं होतंअमिताभ बच्चनला रेडिओ ने नाकारलं होतं. ही सगळी आपाआपली दिशा बदलून पुढच्या क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या अशा स्तरावर कार्य करत जगप्रसिद्ध झाली. 

अर्थात प्रत्येक वेळेलाच आयुष्याची दिशा आपण ठरवू शकत नाही. पण आपल्यात जिद्द मात्र असायला हवी. मुळात काम कोणतंहि लहान मोठं असतच नाहीअशी अजून कितीतरी उदाहरणे देता येतील.  परंतू या  सगळ्या गोष्टीचे सार एकच आहे की, माणसाने सातत्याने कोणतं ना कोणतं तरी काम करत राहिलं पाहिजे.  अन्यथा संसार तर किड्या मुंग्यांची ही होत असतातच.  पण माणसाचा संसार करायचा असेल तर कार्य, कर्तृत्व आणि कर्तव्य जगाला नाही तर येणाऱ्या पुढच्या पिढीला वर्षात देण्यासाठी.

सामान्यपणे प्रत्येक आपत्याला वाडवडिलांकडनं वारस्यामध्ये काही ना काही तरी मिळतच असतं.  जगातल्या सगळ्याच पिढींची ही अपेक्षा असते की आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी काही ना काहीतरी करून जावंं.  वारस्या मध्ये घर, शेत, बंगला, गाडी या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळायला पाहिजेत. परंतु यापेक्षाही अधिक अत्यंत संवेदनशील आणि अत्यंत आवश्यक अशी असणारी गोष्ट वारस्यामध्ये जी मिळायला पाहिजे ती म्हणजे कर्तृत्व.

एका घरातील वडिलांच्या कठोरतेचे उदाहरण नक्कीच देता येईल. मुलगा उच्चशिक्षित होता. परंतु सातत्याने तीन वर्षांपर्यंत काहीच न करता वडिलांच्या कमाईवर घरामध्ये आळस करत लोळत पडलेला होता.  एके दिवशी वडिलांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला. 'नोकरी नाही केली तर घरातून बाहेर जावे लागेल अशी सक्त ताकीद दिली.  आणि काय आश्चर्य पुढील पाच दिवसातच त्यांने छान अशी नोकरी मिळवली आणि कामाला लागला. 

परंतु ही वेळ यावीच कशाला. कर्तृत्व रक्तामध्ये असायला हवं. आपलं आपल्या संसाराच्याप्रतीचं कर्तव्य पार पडायला लागोलो तर कदाचित समाजाप्रतीच्या कर्तव्याची देखील जाणीव होईल. म्हणूनच आजच्या या धावत्या युगात संसाधनांची प्रचंड मुबलकता असताना कार्य, कर्तृत्व आणि कर्तव्य ही गोष्ट निष्क्रिय तरूणांना कळावी एव्हढीच अपेक्षा.


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


  

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...