Sunday, 24 April 2022

शेवटची तारीख


                'शेवटची तारीख कधी आहे ?', हा सामान्यपणे कोणतीही गोष्ट करत असताना विचारला जाणारा प्रश्‍न असतो. अगदी शालेय जीवनापासून ते व्यावसायिक जीवनात प्रत्येक काम पूर्ण करताना विचारात घेतली जाते ती शेवटची तारीख.

                अर्थात एक ठराविक मर्यादा, कालावधी असल्याशिवाय व्यक्ती म्हणून आपणही ती गोष्ट पूर्ण करू शकणार नाही. प्रत्येक व्यक्तीला तिची योग्यता वा क्षमतेच्या व्यतिरिक्त एक प्रयत्न म्हणून काही कालावधी असावाच लागतो. बहुदा याच कारणास्तव प्रत्येक गोष्ट किंवा व्यावसायिक जगात प्रत्येक काम ठराविक कालमर्यादेत पूर्ण करायचे असते. म्हणूनच ते काम पूर्ण करण्याची एक नेमकी तारीख दिलेली असते. तीच शेवटची तारीख असते. म्हणजे त्या दिवसानंतर ते काम पूर्ण झाल्यास त्याला तत्वतः अर्थ नसतो.

                पण याच गोष्टीचा दुसरा अर्थ असा की, आपण शेवटच्या तारखेपर्यंत थांबायचे नसते. शेवटची तारीख हा दिवस म्हणूनच 'डू ऑर डाय' असाच असतो. आणि मुळात शेवटची तारीख येईपर्यंत प्रत्यक्ष आपल्या हातात अनेक दिवस असतात. आणि प्रत्येक काम हे अवघडच असतेच, असे नाही. तात्पर्य प्रत्येक गोष्टीला शेवटच्या तारखेपर्यंत थांबायची आवश्यकता नसते.

                अगदी छोट्या-छोट्या स्वरूपाच्या अनेक गोष्टी असतात, ज्या कळाल्यानंतर लगेच पूर्ण करता येत असतात. पण एकंदरीत एक मानसिकता बनवून गेलेली आहे की, 'अजून वेळ आहे. करू काही दिवसांनी'. पण असा विचार करताना त्या शेवटच्या दिवशीची परिस्थिती कशी असेल हे थोडी सांगता येणार आहे. किंवा आपण ती गोष्ट विसरून गेलो तर?

                शिवाय आपल्याला सर्व काही येत असताना 'मीच का आधी पूर्ण करायचे?' अशी ही मानसिकता असते. बहुदा या मध्ये आपल्या कामात काही चूक असल्यास परत आपल्याला बोलणे खावे लागेल, ही भावना असते. जेणेकरून आपण कोणाच्या नजरेत भरणार नाही. पण याच उलट बहुतांश वेळा प्रत्येकाचे काम क्षमतेनुसार व्यवस्थित असतेच, पण पहिल्यांदा करण्यात पुढे जाण्याची, प्रगतीची संधी आहे हे मात्र पाहिले जात नाही. करिता शेवटच्या तारखेपर्यंत जरी आपले काम तयार असले तरी ते न देता थांबायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे, ही मानसिकता बऱ्यापैकी रुढ झालेली आहे.

                एक व्यक्ती म्हणून प्रत्येकात काही ना काही कमतरता असतातच. जर काम पुरेसे आधी पूर्ण करून जमा करायचा प्रयत्न केला तर कदाचित त्या उणिवा प्रकट होतील. ही देखील भीती असते. म्हणून मग आपल्याला जसे येते तसे ते काम पूर्ण करायचे आणि नेमके शेवटच्या दिवशी जमा करायचे म्हणजे मग असलेल्या उणिवा झाकल्या जातात. परंतु या सोबत ही गोष्ट लक्षात येत नाही की प्रगतीची गती देखील मंदावते. आणि असलेल्या उणीवांचे रुपांतर कौशल्यात करण्यास कधीही संधी प्राप्त होत नाही.

                मदत, सहकार्य बहुदा हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. पण तो शेवटच्या तारखे मुळे अक्षरशः मारला जातो.

                अर्थात जी गोष्ट आपण अगदी सहजपणे एक ठराविक प्रयत्न, कष्ट करून शेवटच्या तारखेच्या पूर्वीच पूर्ण करत असू तर कदाचित ते इतरांसाठी प्रेरणादायी ठरू शकते. शिवाय ज्यांना ती गोष्ट पूर्ण करण्यास अडचणी येत असतील त्यांच्या करिता ती व्यक्ती एक प्रकारे मदतनीस म्हणून समोर येऊ शकते. आणि साहेबांपर्यंत पोहोचण्या पेक्षा सहकार्यांपर्यंत पोहोचत मदतीची धाव घेणे कधीही सोपे असते. तेच काम ती व्यक्ती शेवटच्या तारखेपर्यंत न थांबता करत असेल तर होऊ शकते. पण इतरांची जबाबदारी नको असा भाव कुठेतरी मनात निर्माण होतो. आणि आपले काम तयार असताना देखील नेमके शेवटच्या तारखेला जमा केले जाते.

                या अशा वर्तणुकीमुळे समाजव्यवस्थेचे नुकसान होत असते. शिवाय आपली क्षमता कदाचित नसेल तरी देखील ते शेवटच्या तारखेपर्यंत न थांबल्यास आपल्यातल्या नव्या व्यक्तीची ओळख कधीही होणार नाही. म्हणून 'अजून वेळ आहे करून शेवटच्या तारखेला' या मानसिकतेतून बाहेर नक्कीच यायला हवे....


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९ 

Sunday, 10 April 2022

माघारी होणारी चर्चा

 


कुणा एका महान संतांचे वचन आहे, 'तीच व्यक्ती सर्वोत्तम जिच्या माघारी देखील तिच्याविषयी चांगलेच बोलले जाते'. गीतेतील 'उत्तम पुरुषा'ची   लक्षणे सांगितली आहेत बहुदा त्याचे हे वचन म्हणजे अगदी प्रत्येक सांसारीकासाठीचे अगदी साध्या भाषेत   मांडलेले सर्वोत्तम तत्त्वज्ञान आहेपण मग विचार येतोहे वचन संतांसाठी सामान्य असेल पण सामान्यांसाठी असे राहणेवागणे जरा दुर्मिळचतरीदेखील हे वचन सामान्य नागरिकांसाठी तर सांगितले गेले आहे.

'सज्जनहा शब्द बऱ्यापैकी रुढ झालेला आहेपण त्यामागे अशी पार्श्वभूमी असेल अशी कल्पना   करण्यास मन तितकेसे तयार होत नाहीकारण एक तर 'दोष नाहीअशी व्यक्ती सापडणे अशक्यआणि  त्यातल्या त्यात 'दोषांवर चर्चा होणार नाही', ही अपेक्षा देखील चुकीचीअर्थात व्यक्तीच्या दोषांवर माघारी चर्चा होणे स्वाभाविकच.

परंतु इथे 'माघारी होणारी चर्चाकेवळ व्यक्तीच्या दोषांवर हा विषय अपेक्षित नाहीतर त्या व्यक्तीने  जे नकळतपणे आपल्याला दिलेले दुःख असते त्यावर इतरांच्या समोर त्या 'व्यक्ती विषयी होणारी चर्चाहे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे.

खरेतर मराठीत त्याकरिता अत्यंत सुंदर असा शब्द आहे - 'उखाल्या पाखाल्या'.

मनावर झालेले आघात अत्यंत क्लेशकारक असतातचएक तर ते दिसत नाहीत आणि कदाचित याच  कारणामुळे ते अशा पद्धतीने मांडले जातात  व्यक्त केले जातातज्यामुळे देखील होणारी हानी भरून   निघणारी नसते.

पण परिणामांचा फारसा विचार  करता ही चर्चा करणे फार महत्त्वाचे आहेअसे वाटून ती सुरू राहतेठेवली जातेआणि नकळत दुःख अधिक वाढत जाते.

माघारी होणाऱ्या चर्चा मागे त्या व्यक्तीने आपल्याला दिलेला त्रासहे दुःख मोठे असतेचपण ते मनात  अक्षरशः साठवून ठेवले जातेते सोडून दिले जात नाहीमोकळी वाट करून दिली जात नाहीआणि जेव्हा  मोकळी वाट करून दिली जाते ती नेमकी दुसऱ्या इतर कोणत्यातरी व्यक्तीच्या समोर.

परंतु या ठिकाणी एक मेख आहेज्या व्यक्ती समोर आपण ते दुःख व्यक्त करत असतोत्या व्यक्तीला तसा अनुभवत्रास त्या त्रास देणाऱ्या व्यक्ती कडून झालेला असेलच असे नाहीअर्थात दुःखाचा प्रसंगती   घटना व्यक्तीसापेक्ष असतेअर्थात त्या त्रास देणाऱ्या व्यक्तीचा स्वभाव तसा असेलही असे ठामपणे सांगणे   चुकीचेपरंतु ते केले जातेआपल्या मनातील 'खदखदइतरांसमोर मांडली जाते.

आणि कधी कधी ती तर अत्यंत रंगवून दाखविले जातेया सगळ्या प्रकारात हा देखील उद्देश असतो कीआपल्याला स्वतःला देखील सहानुभूती मिळवायची असते.

पण दुःख इथे संपत नाही तर ते अधिक वाढत जातेकिंबहुना ते आपण स्वतःहून द्विगुणित करत   असतोआणि कदाचित ज्या व्यक्तीला आपण ते सगळे ऐकवले त्याच्या मनात देखील ते खूप खोलवर फसते.

खरेतर 'मोक्षप्राप्ती', 'स्वर्गप्राप्तीही मानवी जीवनाचे अंतिम ध्येये असतीलहीपण ती मृत्यूनंतरचीअर्थात ती मिळावी यासाठी   सगळेच प्रयत्न करणारपण ती मिळाली का नाहीहे कधीच कोणाला सांगता येत नाहीम्हणूनच जिवंतपणाचे ध्येय लक्षात घेणे महत्त्वाचेआणि कदाचित ते असेल तर ते एक मात्र म्हणजे 'निर्भेळ आनंद'. 

आणि हा असा 'निर्भेळ आनंदमिळवायचा असेलतर नात्यात गोडवा निर्माण करावा लागणारतरच तो संपूर्ण जीवनात पसरेलआणि मग स्वाभाविकच ज्याला हे प्रेमळ नातं निर्माण व्हावं असं वाटतं त्याला ते   दुःख देखील विसरावे लागणारतो कटू अनुभव सोडून द्यावा लागणारत्याची इतरांच्या समोर केली जाणारी  अर्थात माघारी होणारी चर्चा सोडावी लागणार.

परंतु सुखापेक्षा मनुष्याला दुःख कुरवाळायला अधिक अधिक आवडतंआठवून पहाएखाद्या छानशा विनोदावर आपण पहिल्यांदा अगदी खळखळून हसतोपण दुसऱ्यांदातिसऱ्यांदा आपण त्यालाच 'रटाळवाणाम्हणतोपण हेच दुःखाच्या बाबतीत मात्र होत नाही!

म्हणून अशा प्रसंगात परत एकदा 'संत वचनचकामाला येतंसमर्थांचे वचन आहे, 'मना बोलणे नीच सोशीत जावे'. किंवा शारदामातांनी देखील अगदी सोप्या शब्दात सांगून ठेवले आहे, 'प्रेमात सदैव नमतं घ्यावं म्हणजे नातं टिकतं.' अर्थात कोणत्याही नात्यात माघार घ्यावी पण माघारी चर्चा करू नये.

शिवाय अजून एक गोष्ट महत्त्वाची आपल्या मनातील दुःख मोकळे करायचे झाल्यास ते थेट त्याच व्यक्ती जवळ केले जीने आपल्याला त्रास दिला आहेतरबहुदा अशा वागण्याने आपल्या मनातील कटुता वाढणार नाहीआणि नेमकेपणाने त्या व्यक्तीलाही सुधारण्याची संधी दिल्यासारखे होईल...


©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९


सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...