तिने जागतिक पर्यावरणाच्या दिवशी इटुकल्या लाडोबासोबत काही रोपं लावली. परंतू त्याला कोणतीही सूचना वा गोष्ट सांगितली नाही.
तो दुसऱ्या दिवसापासून स्वतःहून रोपांना पाणी घालू लागला.
एव्हाना तिच्या लक्षात आले होते, ‘आपली लागवड योग्य झाली आहे’.
तिने जागतिक पर्यावरणाच्या दिवशी इटुकल्या लाडोबासोबत काही रोपं लावली. परंतू त्याला कोणतीही सूचना वा गोष्ट सांगितली नाही.
तो दुसऱ्या दिवसापासून स्वतःहून रोपांना पाणी घालू लागला.
एव्हाना तिच्या लक्षात आले होते, ‘आपली लागवड योग्य झाली आहे’.
त्याने प्रेमात पडल्यावर तिला वचन दिले होते, ‘तूझ्यापदरांत जगातील सगळी सुखं आणून ठेवीन’. एका मध्यमवर्गीयाने पाहिलेले हे एक खूप मोठे स्वप्न होते.
त्याने काही वर्षांनी एक मोठा बंगला बांधला.
बंगल्याला नाव दिले होते ‘प्रेमाची शक्ती’.
'आलेल्या क्लेममध्ये जेवढ्या जास्त त्रुटी काढशील तेवढा जास्त इंसेण्टिव', त्याला इन्शुरन्स कंपनी जॉईन केल्यावर टार्गेट देण्यात आले.
त्याने दुसऱ्याच दिवशी कंपनी सोडून दिली.
त्याला 'मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणे', या म्हणीची प्रचिती नको होती.
‘एवढाच त्रास होत असेल तर जा तुझ्या वडिलांच्या घरी’, तो छोटाश्या वादांवरून तिला बोलून गेला.
तशी त्यालाच त्याची लाज वाटली नि क्षणाचाही विलंब न करता त्याने तिची माफी मागितली.
त्यानंतर त्याने तिला वचन दिले, ‘तुझ्यासाठी सर्व सुख मिळवण्याचा प्रयत्न करेनच. परंतू ‘शब्द दारिद्र्य’ कधी येऊ देणार नाही’.
तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली. ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...