Sunday, 26 March 2023

अलक


त्याला नववर्षाचा संकल्प काय करावे, हे काही केल्या सुचत नव्हते.


नि शेवटी त्याने रोजनिशीत 'केवळ नावीन्य' हे दोन शब्द लिहिले.

अलक

 

तो त्याच्या लिखाणाला सुरवातीस तो समाजपरिवर्तनाचे 'शस्त्र' असे संबोधायचा.

लिखाणातील प्रगल्भता जशी जशी वाढत गेली तसे तसे त्याच्या लक्षात आले, ते तर त्याच्या अंतर्मनावरील 'वस्त्र' आहे.

नि आता रसिक वाचक त्याचे लेख वाचून म्हणत होते, 'तो त्याच्या लेखांतून संस्कृती जतन करतो.'

अलक


त्या दोघांत बऱ्याच दिवसांत कडाक्याचे भांडण झाले नव्हते.

त्याला काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत होते.

मग नकळत त्याने तिच्या माहेरचा विषय काढला.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...