Saturday, 31 August 2024

अलक ४३५



त्याने ‘राष्ट्रीय क्रिडा दिवसाच्या शुभेच्छा’ असे सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.

ते पाहून त्याचा मुलगा खूप रडला.

त्याने मुलाला खेळात करिअर करायची परवानगी दिली नव्हती.

Friday, 30 August 2024

अलक ४३४



त्याला एक नवीन कथाबीज सुचले, ‘पतीच्या जाचामुळे पत्नीने केलेली आत्महत्या’.

परंतू तो या कथाबीजाचाचे कथेमध्ये रुपांतर करू शकला नाही.

त्याला राहून राहुन प्रश्न पडत होता ‘मग ‘पुरुषार्थ’ शब्दाला काळीमा तर लागणार नाही.

अलक ४३३



काही परकीय आक्रमकांचा भारतातील श्रद्धा स्थानांवर हल्ला करणे, हाच उद्देश राहिला.

आज त्यातील प्रमुख एका श्रद्धा स्थानाचे पुनर्निर्माण झाले.

जाणकार मात्र त्यांस ‘राष्ट्र मंदिराचे निर्माण’ म्हणत आहेत.

Wednesday, 28 August 2024

अलक ४३२



तो : आपल्याला एकच मुल हवं आहे.

ती : नाही. दोन होऊ देऊ.

तो : एकालाच सर्व काही देऊ.

ती : नी त्या एकाला कुणाचीतरी सोबत नको?

एव्हाना तो दुसरं मुल झाल्यानंतर हस्तांतरित झालेले ‘वडिलपण’ अनुभवत आहे.

अलक ४३१



त्याला आवडीचे रुपांतर व्यवसायात करू न शकल्याचे शल्य होते.

त्याची मन:स्थिती पाहून पत्नीने त्याला आठवण करुन दिली, ‘आवड प्रियसी प्रमाणे असते. आणि विस्मरणांतच शांती असते’.

अलक ४३०



त्याला आवडीचे रुपांतर व्यवसायात करू न शकल्याचे शल्य होते.

त्याची मन:स्थिती पाहून पत्नीने त्याला आठवण करुन दिली, ‘आवड प्रियसी प्रमाणे असते.’

Sunday, 25 August 2024

अलक ४२९


ते निवृत्ती नंतर पत्नीला अधिक वेळ देऊ लागले. तिने मात्र एकट्यानेच संसाराचे रहाटगडागे चालवण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या वयातील बंडाला कारण होते,

पतीने तिची काळजी करण्याच्या दिवसांत  स्वतःला कामाला वाहुन घेतलेले.

अलक ४२८



त्याने चाळीशी ओलांडल्यानंतर दाढी-मिश्या वाढवलेल्या पाहून मित्रांनी खूप मजा घेतली.

त्याला वाटले होते, आता वय दिसले पाहिजे. झाले उलटेच, मित्रांमुळे तारुण्य अधिक अनुभवायला आले.

अलक ४२७



तो एकदा सहजच म्हणून गेला, “मुलं झाल्यानंतर बायकोचं नवऱ्यावरचं प्रेम कमी होतं“. 

तिचं जीव लावणं खरंतर त्याला कळालंच नाही. 

अनेक वर्षांच्या संसारानंतर त्याला उमगलं, आईनंतर आईसारखी काळजी करणारी तीचतर आहे.

Wednesday, 21 August 2024

अलक ४२६



तिच्या इटुकल्या लाडोबाला चांदोमामा खूप आवडायचा. परंतू तो आमावस्येकडे जाणारा चंद्र पाहून हिरमुसून जात असे.

तरीही तिने त्याला कधी समजावून सांगितले नाही.

भावना होती ‘त्याची आयुष्यातील सगळ्या चढ-उतारासाठीची तयारी असावी’.

अलक ४२५



तो कधी कधी स्वतःच्या निर्णयांवर स्वतःच शंका घ्यायचा.

परंतू काही दिवसांनंतर त्याच्या वागण्यात आमूलाग्र बदल झाला, त्याच्या वाचनात एक लेख आला होता.

शिर्षक होते ‘पूर्व विचार. पूर्ण विचार’.

अलक ४२४

 त्याला सरकारने हाती घेतलेल्या ‘महिला सुरक्षा अभियाना’वर एक गीत लिहून मागितले. नुकत्याच झालेल्या आत्याचाराची पार्श्वभूमी होतीच.

तो विषण्णमनाने ‘रक्षाबंधन’ या पलिकडे काही लिहू शकला नाही.

Saturday, 17 August 2024

अलक ४२३



मुलगा खूप आनंदाने वयोवृद्ध आईला नवीन बांधलेले घर दाखवायला घेऊन गेला.

आईचे डोळे भरून आले.

ती म्हणाली, “आता इथून पुढचे पावसाळे सुखाचे असतील. कारण तू बांधलेले घर गळत नाही”.

अलक ४२२



त्याने ज्या वयांत प्रेम कविता लिहायची त्या वयांत भारतमातेची आरती रचली.

आई त्याचवेळी समजून गेली, चिरंजीवांनी मोठ्या आईची पूजा आरंभिली आहे.

एव्हाना तिला कळून चुकले होते ‘आपणच मुलाला लहानपणी क्रांतीकारांच्या गोष्टी सांगायचो’.

अलक ४२१



‘अखंड भारत’ की ‘भारत अखंड’ या दोन संकल्पनेत काही राजकीय मंडळी अडकली होती.

तेंव्हा एका साहित्यिकाने या राजकीय मंडळींना एक पुस्तक भेट दिले.

नाव होते ‘विस्मृत इतिहासाचे परिणाम’.

Tuesday, 13 August 2024

अलक ४२०



बांग्लादेशातील हिंदूंवर जीवघेणे हल्ले झाले, अनन्वित अत्याचार झाले तरी त्यांनी देश सोडला नाही.

मुलाखती दरम्यान एक बांग्लादेशी हिंदू म्हणाला, “आम्ही रामाचा वारसा जपतोय. ‘जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी’.

अलक ४१९



त्याने दहावीचे महत्त्वाचे वर्ष असे म्हणून तबला वर्ग बंद केला.

त्याला दहावीत तर चांगले गुण मिळाले परंतु बंद पडलेले तबलावादन परत कधीही सुरु झाले नाही.

तो आता मोठं झाल्यावर कामाच्या धकाधकीत ‘आनंद’ शोधतो आहे.

Saturday, 10 August 2024

अलक ४१८



ती नागपंचमीची पूजा करुन कॉलेजमध्ये पोहचली. ‘प्रगत काळातील मागास तरूणी’ म्हणून मैत्रिणींनी तिची अवहेलना केली.

तिने संस्कृतीचा वारसा जपण्यासाठीची ही खूप छोटी किंमत आहे, असे समजत मैत्रिणीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले.

Friday, 9 August 2024

अलक ४१७



तिने अनेक वर्षानंतर नागपंचमीचे निमित्तसाधून कंबरकसून मनसोक्त झोका खेळला. हिंदोळे मात्र मनाला बसले.

परंतू ती थांबली नाही.

एव्हाना तिच्या आधुनिक युगातील मुलींना आता आई कमी आणि मैत्रीण अधिक दिसत होती.

Friday, 2 August 2024

अलक ४१३



एके काळी ‘दिल्लीला जाणे म्हणजे भारतात जाणे’, असे ईशान्य भारतीय म्हणायचे.

एका ‘मूळभारतीय शिक्षण न्यास’ नावाच्या  संस्थेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कार्य  सुरु केले.

काही दशकांनंतर मोठे सामाजिक परिवर्तन पाहायला मिळत आहे.

तेंव्हा त्या संस्थेने श्रेय मात्र ईशान्य भारतीय नागरिकांना दिले.

Thursday, 1 August 2024

अलक ४१२



एका राजकीय पक्षाचे अस्तित्व संकटात आले होते. जातींच्चे राजकारणही क्लिष्ट होत चालले होते.

मग त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष भारत’ म्हणत धर्मावर आधारित आरक्षणचा नारा दिला.

अलक ४११



निसर्ग कोपला की मनुष्याचा बळी घेतो. आणि दुसरीकडे प्रफुल्लीत, बहरलेल्या निसर्गाचा बळी घेण्याचे कार्य मनुष्याने सुरू ठेवलेले आहे.

मनुष्याचे दुदैवच.

एव्हाना ‘दोहन’ न उमजलेल्या मनुष्याला निसर्गाने ‘दहन’ दाखवणे सुरूकेले आहे.

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...