Sunday, 4 November 2018

मनुष्य



एकात्मवाद, द्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद हे सारे वाद मनुष्याने मनुष्याकरिताच मांडले.
अर्थात सर्वांच साध्य मनुष्याचा मोक्ष हेच होतं.

पण एके दिवशी एक नवाच वाद निर्माण झाला.

हा वाद पंचमहाभूतांमधील होता.

पृथ्वी म्हणाली, "स्पर्शाला अर्थ आणि आकार मी प्राप्त करून दिला".
जल म्हणाले, "मी तर जीवन. माझ्या विना जीवनाची कल्पनाच व्यर्थ".
तेज म्हणाले, "चैतन्य तर माझ्यामुळेच निर्माण झाले".
वायु म्हणाला, "मी तर प्राणवायू. माझ्या संचाराविना सारे काही स्तब्ध".
आकाश म्हणाले, "काम, क्रोध, शोक, मोह, भय मी निर्माण केले. कल्पनाविलास ही मीच".

ही सगळी पंचमहाभूते आपआपल्या मतांवर खूपच ठाम होती.
प्रत्येकजन आत्मस्तुतीच रमाला होता.
आणि शेवटी वाद एवढा वाढला की, प्रत्येक महाभूतानी विभक्त व्हायच ठरवलं.

पण काळाचा महिमा इतका अगाध की,
मोक्षाच्या वाटेवरील मनुष्याला मात्र तिळमात्र काळजी नव्हती.


@हेमंत विनोद पोहनेरकर

15 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य कळवावे.

Unknown said...

सुंदर... असाच लिहीत रहा...

Raja Kadam said...

हा मोक्ष स्वर्गप्राप्तीचा की नरकयातनांचा ???

Raja Kadam said...

हा मोक्ष स्वर्गप्राप्तीचा की नरकयातनांचा ??

Unknown said...

माणूस एकाच विचारात गुरफटला कि वादात अडकतो, विवेकी असला कि वादांवर तरंगतो.

हेमंत पोहनेरकर said...

लय भारी

Manoj perkar said...

Very nice 👌👌👌👌

Unknown said...

छान प्रेरणादायी

Unknown said...

Wah! Apratim!! Go ahead, !!!

Unknown said...

राष्ट्रीय दि.21कार्तिक1940
खुप छान!!

Unknown said...

मानवी स्वभाव सूंदर चित्रण

SUDAMA said...

Hunn
Khup chan

Unknown said...

अतिशय सुंदर लेख

Unknown said...

खुप सुंदर

Kishor Pathak said...

मस्तच

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...