त्याला तत्वज्ञान विषयात पीएचडी करायची होती.
परंतु गुरूंनी त्याच्या कडून तीन वर्ष सेवा करवून घेतली.
ती पूर्ण झाल्यावर तो म्हणाला, "आता मला तत्वज्ञान विषयात पीएचडी करायची गरज नाही."
गुरु शांतपणे त्याच्याकडे पाहत होते.
तो पुढे म्हणाला , "कारण जाणीव ते नेणीव हा माझा प्रवास तुम्ही अगदी सहज पूर्ण केला आहे."
No comments:
Post a Comment