१.
तो ‘मल्हार’ नावाने काव्य रचायचा.
अर्थातच स्वतःची जगाला कधी ओळख होऊ दिली नाही.
त्याने ‘आयुष्याच्या संध्याकाळी’ या काव्यात नमूद केले ‘माता-पित्यांनी त्याला ‘मल्हारी-म्हाळसाकांता’च्या चरणी वाहिले होते’.
२.
त्याने आजवर लिहिलेल्या कविता मोजायला सुरुवात केली. त्याने हजारी गाठल्याचे लक्षात आल्यावर मोजणी सोडली.
आणि ‘अनंता’ची कविता लिहिली.
३.
ती कवयित्री होती.
तो : मला कधी कधी मला तुझ्या कविता नाही कळत.
तिने त्याला ‘स्त्रीमन’ न उलागडाता आल्यामुळे क्षमा केले.
©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९
No comments:
Post a Comment