Sunday, 12 September 2021

उपवास, उपहास आणि उपासक

 

'उपवास' आणि 'उपहास' हे शब्द एव्हाना समानार्थी झालेले आहेत की काय असे वाटते. कारण 'उपवास' म्हणजे नवनवीन पदार्थ खण्याच्या पर्वणीचा दिवसअसंच उपवासाचं रसभरीत वर्णन किंबहुना प्रत्यक्ष कृती पाहायला मिळते.
तसेच ‘एकादशी दुप्पट खाशी’ हा  निबंध बालपणी कुणी लिहीला नाहीवाचला नाही वा ऐकला नाही असा विद्यार्थी देखील विरळाचतात्पर्य एकंच कीपालक असो शिक्षक असो वा कुणीही नातेवाईक असो उपवासाला उपहासाच्या परिभाषेतून आजवर व्यक्त करत आलेले पाहायला मिळतात.
आणि असं आपल्याच संस्कृतीचं जरी रूढी बदलत गेलीपरंपरा बदलत गेली तसं आपण स्वतःच उपवासाचा उपहास करत आलेलो आहोत.

खरंतर एक व्यक्ती म्हणून आपण आपल्या घरातील गोष्टी चारचौघांत कधीही मांडत नाहीतजरी त्या चुकीच्या असल्यात्रासदायक असल्या तरीहीपण शास्त्राधार असलेल्या उपवासाचा मात्र आपण उपहास केला आहेआणि याकरिता आपणच कारणीभूत आहोत, एक उपासक म्हणूनउपभोक्ता म्हणून.

जगाच्या पाठीवर कुठेही उदाहरण नाही की, आपल्याच संस्कृतीमध्ये असलेल्या गोष्टींचं विडंबनात्मक स्वरूप चारचौघात मांडल्याचेआहे ते केवळ भारतातचजुन्या अयोग्य रूढीपरंपरा यांच्यावर प्रहर झालाच पाहिजेयोग्य त्या पद्धतीने आंदोलने झाली पाहिजेत, समाज प्रबोधन झाले पाहिजे. नव्हे तसा आपला इतिहास देखील आहेपण आपल्या वैभवशाली संस्कृतीचे विडंबनात्मक पद्धतीने मांडणी करून आपण अनवधानाने अवमान आपलाच करतो आहोत, हे आपल्या लक्षात येत नाही.

आणि याहीपेक्षा अधिक गंभीर बाब म्हणजे उपवासाला उपहासाच्या स्वरुपात आपल्या मनावर अगदी बालपणापासूनच बिंबवलं जातंएकादशी दुप्पट खाशी’, हा विषय अगदी सहज लहानमुलांशी बोलला जातो. नव्हे तशी वर्तवणूकही होते. याउलट आपल्या पाल्याला उपवासाचं महत्त्व पटवून देत नवे उदाहरण प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळत नाही. शिवाय आजवर कुणातरी पालकांनी आक्षेप घ्यायला हवा होता की एकादशी दुप्पट खाशी’ हा  निबंध शालेय अभ्यासक्रमातून काढून टाका म्हणूनपण आपले दुर्दैव असे कीहेच ते पालक आपल्या पाल्याने हा निबंध कसा छान लिहिला आहेयाचा अभिमान बाळगत असतात.

आणि आता तर काय आपण डिजीटल जगात प्रवेश केला आहे. म्हणून पारंपरिक उपवासाच्या ऐवजी ‘इंटरनेटचा उपवास’, ‘मोबाईलचा उपवास’, ‘टी.व्ही.,कॉम्प्युटरचा उपवास' अशा तथाकथित अतिप्रगत, अतिव्यापक, अतिउदार कल्पना मांडल्या जात आहेत.

पण या सगळ्याच्या  मुळाशी माणसाचे आरोग्य आहे आणि त्या सोबतच मन आहे. आज आपण सुपर सुपर स्पेशालिटीच्या जगात पोहोचलो असलो तरी सगळेच डॉक्टर मान्य करतात की, गोळ्या औषधांसोबतच योग्य प्रमाणात अन्न रस पोटात गेला की प्रकृतीमध्ये सुधारणा व्हायला अधिक मदत होते.

फलं आहाराचा आपण ‘फराळ’ केला आहे निरं आहाराचा आपण निऱ्हाळ केला आहेम्हणून ही सगळी गडबड आहे.

मी माझी आई आणि आजी यांना अनेक वर्षांपासून पाहत आलो आहे. सोमवारमंगळवारशिवरात्र, चतुर्थी, एकादशी या दिवशी या दोघींनी कधीही काहीही खाल्ले नाहीथेट संध्याकाळी उपवास सोडायचा किंवा एकादशी सारख्या दिवशी उपवासाचे काहीतरी खायचे, पण तेही केवळ एक वेळेसंच. परिणाम पाहायला मिळाला तो असा कीआजी वयाच्या ८३ वर्षापर्यंत निरोगी होतीमधुमेहरक्तदाबदमा हे आजार तर सोडाच कधी दवाखाना पाहिल्याचेही आठवत नाहीआणि आता आई देखील तशीच ठणठणीत आहे.

सुरुवातीला वाटायचं पूर्वीच्या काळच्या लोकांच्या प्रकृती मुळातच  चांगल्या होत्यात्यांना अन्न देखील शुद्ध खायला मिळालेपण डॉ.आहसुमी या जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेले वाचनांत आलेतो विषय ऑटोफेगी हा होताआपल्या संशोधनात डॉ.आहसुमी लिहितात की, ‘जगात सगळ्यात कमी प्रमाणात कर्करोग पाहायला मिळतो तो भारतातकारण भारतीयांना उपवास करायची सवय आहे’.

असा परकीयांनी संदर्भ दिला की, आपल्याला उपवासाचं महत्व पटायला लागतंपण वस्तुस्थितीत हे संशोधन देखील भौतिक पातळीपर्यंतच टिकणारे आहेकारण ते केवळ मानवाच्या शरीर रचनेचा आभ्यास करून झालेले आहेपण आपल्या धर्मातशास्त्रात त्याही पुढचा विचार केलेला आहे. कारण मनातील भावनामस्तिष्कातील विचार यांना देखील अन्न कारणीभूत असतंआपण ज्या ज्या  प्रकारचे अन्न खात असतो, त्या त्या प्रकारचे आपले विचार होत जात असतातम्हणून सात्विक आहार महत्त्वाचा आहे. तसेच पावसाळ्या सारख्या रोगराईच्या दिवसात, अर्थात चातुर्मासात निर आहार ही महत्त्वाचाअर्थात म्हणूनच चातुर्मासात अनेकजन आजही केवळ एक वेळ जेवण करतात.

म्हणून मुळातच भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून टिकण्याचे हेच कारण आहे कीमानवाचा सर्वांगीण विकासाचा विचार यात पाहायलाअनुभवायला मिळतोज्याचे उदाहरण उपवासाच्या माध्यमातून पाहायला मिळते.

म्हणूनच 'उपासका'करिता 'उपवासा'चा मार्ग हा शरीरशुद्धीकरणातून अन्त:करण शुद्धीकरणापर्यंत जाणारा मार्ग आहे...


©हेमंत पोहनेरकर
९५ ९५ ९६ ९९ ८९

9 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे

Virag Pohnerkar said...

छान!

G Chandrashekhar said...

छान

bapatpramod said...

नित्याच्या विषयातील विसंगती नेमकेपणाने टिपली आहे.संस्कृतीचा वारसा म्हणून मिळालेल्या विषयांतील निसटणारे निके सत्त्व दाखविणारा हा लेख महत्वपूर्ण वाटला.

Unknown said...

छान

हेमंत पोहनेरकर said...

धन्यवाद चाचाजी

हेमंत पोहनेरकर said...

धन्यवाद गौरशेटे सर

हेमंत पोहनेरकर said...

भारतीय संस्कृती आजच्या भाषेत मांडली कि ती तरुण देखील स्वीकारतील, एव्हढाच या लेखामागील उद्देश...

धन्यवाद प्रमोदजी...

हेमंत पोहनेरकर said...

मन:पूर्वक धन्यवाद

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...