नेतृत्वगुण नसतानाही केवळ वारसाहक्काने त्याची एका सामाजिक संघटनेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
परिणामतः अनेक निष्ठावान कार्यकर्ते संघटना सोडून जात होते.
तरीही तो एक वाक्य सदैव म्हणायचा, "माझे कोणावाचून अडत नाही."
नि एके दिवशी लोकोपयोगी असणारी ती सामाजिक संघटना बंद करावी लागली.
आता लोकं म्हणत होती, "खरंच कोणावाचून कोणाचं अडत नाही."
No comments:
Post a Comment