.
एव्हाना दोघांनीही चाळिशीत पदार्पण केले होते. संसारात प्रगल्भता आली होती.
ती रुसायची नाही. तो रागवायचा नाही.
प्रेमातील ओलावा मात्र जाणवायचा.
त्याला कामावरून येण्यास कितीही उशीर होवो, ती जेवायला थांबायची.
नि उशीर झालेल्या दिवशी, तो आठवणीने तिच्या वेणीत गजरा माळायचा.
ती दोघं व्यक्त ते अव्यक्त प्रेम अवस्था अनुभवत होते.
No comments:
Post a Comment