Monday, 20 December 2021

दुसरी नोकरी/व्यवसाय

 


'दुरून डोंगर साजरे', ही उक्ती आपणांस ठाऊक आहेच. पण तरीही एक मानसिकता असते, दूरवर दिसणारी हिरवळ अधिक सुंदर, मनमोहक आहे. प्रत्यक्षात तिथेही परिस्थिती फारशी वेगळी नसते. पण मन ही अशी गोष्ट आहे की, जी सदैव आशाळभूत असते.

आणि हीच गोष्ट आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायाच्या बाबतीत त्याच मानसिकतेची आहे. बहुतांश व्यक्तींना आपण करत असलेली नोकरी किंवा व्यवसायापेक्षा दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय हा अधिक खुणावत असतो. त्या दुसऱ्या नोकरी किंवा व्यवसाय मध्ये अधिक नफा आहे, अधिक संधी आहे, असे सातत्याने वाटत असते. आणि ते देखील सुरू असलेली वर्तमान नोकरी किंवा व्यवसाय करत असताना.

वर्तमान परिस्थितीत किंवा अधिक अधिक असलेल्या अपेक्षांचा जगात स्पर्धेत पुढे राहण्यासाठी, अधिक अधिक असलेल्या अपेक्षा, अधिक साधन संपत्ती मिळवण्यासाठी हे सर्व असू शकते. किंवा यापेक्षा वेगळे म्हणजे आपली इच्छाच वर्तमान नोकरी व्यवसाय करण्याची नसून दुसरे काहीतरी करण्याची आहे. अर्थात आपले कदाचित 'स्वप्न' अधिक काहीतरी वेगळे आहे! म्हणून दुसरी नोकरी दुसरा व्यवसायाचा मागे धावणारे अनेक जण असू शकतात, नवे असतीलही.

परंतु या थोडसा विपर्यास आहे. जर आपले स्वप्नच दुसरे काहीतरी आहे तर ते 'पार्ट-टाइम प्रयत्न' करून पूर्ण होईल? अर्थात या धावत्या जगात दुसरी नोकरी/ व्यवसाय करण्यास असा कितीसा वेळ मिळतो? जेणेकरून आपण ते स्वप्न पूर्ण करू शकू.

गरज भागवणे यापेक्षा अधिक काही दुसरी नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून होत नाही. कुण्या एका महापुरुषाने सांगून ठेवले आहे की, आपली आवड अर्थात आपली नोकरी वा व्यवसाय इतका वेडा होऊन केला पाहिजे की, आपल्याला जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी तीच गोष्ट दिसली पाहिजे. त्याच गोष्टीचे चिंतन केले पाहिजे. आपल्या रंध्रारंध्रात त्याचाच ध्यास असला पाहिजे. आणि असे झाले तरच ती गोष्ट निश्चितच आपल्याला प्राप्त होते. अर्थात आपले स्वप्न आपल्याला पूर्ण करण्याचा हा एक मार्ग सर्वांना ज्ञात आहेच.

आणि ही काही खूप आदर्श कल्पना आहे, असे मुळीच नाही. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये व्यवसाय करणारे कितीतरी व्यापारी हे प्रगत आहेत. वर्षानुवर्षाच्या अथक प्रयत्नातून त्यांनी त्यात जम बसवलेला असतो. आणि तोच व्यवसाय आहे ते सातत्याने करताना आढळतात. दुसरा व्यवसाय करत नाही. अलीकडच्या काळात फार फार तर असे पाहायला मिळते की, त्यांनी त्यांची 'दुसरी शाखा' इतरत्र सुरू केलेली आहे. अर्थात ते व्यवसायाचे 'एक्सपान्शन' असते.

शिवाय दुसरी नोकरी असा विचार करायचा या ऐवजी, पहिलीच नोकरी पण दुसऱ्या संस्थेत, दुसर्‍या कंपनीत वा दुसऱ्या शहरात असा विचार होत नाही. आणि झालाच तर चाकोरीच्या बाहेर पडण्याचे धाडसही केले जात नाही. आणि जे असे धाडस करतात ते अर्थातच यशस्वी होतात. वा त्यांना अपेक्षित ते मिळते. स्वप्न पूर्ण होते. कारण आताचा काळ पूर्वीप्रमाणे 'आजीवन सभासद' याप्रमाणे एकाच संस्थेची चाकरी करण्याचा निश्चितच नाही.

आणि वर्तमान काळात अजूनन एका मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज आहे. आणि ते म्हणजे एखादी नोकरी वा व्यवसायात 'स्कोप' असणे. खरेतर स्कोप पाहून दुसरी नोकरी, दुसरा व्यवसाय करणाऱ्यांना तसे उमगलेच तर पहिली नोकरी/व्यवसाय सोडण्याचे धाडस होत नाही. परंतु सत्य तर हे आहे की, 'स्कोप' वगैरे असे शब्द आजच्या काळात कालबाह्य झाले आहेत. त्याचे कारण म्हणजे 'स्काय इज द लिमिट' ही नवीन संज्ञा रूढ झाली आहे. प्रत्येक क्षेत्रात करू तेवढी संधी प्राप्त होणारे दिवस आहेत. म्हणूनच स्वप्नांचा पाठलाग 'हाफ हार्टेडली' होत नसतो.

 फार फार तर या तेवढीच गोष्ट असू शकते की, आपण आपला एखादा छंद हा दुसरी नोकरी व व्यवसाय प्रमाणे जगू शकतो. अर्थात तो आपल्या आनंदाचा भाग आहे म्हणून. कारण त्याकडे आपण उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता निर्भेळ आनंद म्हणून पाहत असतो.

एका प्रकट मुलाखती मध्ये प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते श्री अशोक सराफ यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता की, 'तुम्ही अभिनेता नसते तर काय झाले असते?'

त्यावर त्यांचं स्पष्ट उत्तर होतं की, 'काहीच झालो नसतो. मला अभिनेता व्हायचं होतं. आणि मी अभिनेताच झालो.'

अर्थात खुणावणारी 'क्षितीजं' ही अनेक असू शकतात. पण ज्याचा सातत्याने एक व्यक्ती म्हणून आपण पाठलाग करून प्राप्त करू, समाधानाने जगू असे कोणतेही एकच असू शकते. दुसरे नाही...

म्हणूनच दुसरी नोकरी किंवा दुसरा व्यवसाय याचा गांभीर्याने विचार व्हावा...

©हेमंत पोहनेरकर

भ्र.क्र. :- ९५ ९५ ९६ ९९ ८९

6 comments:

हेमंत पोहनेरकर said...

कृपया आपले अभिप्राय अवश्य नोंदवावे

Unknown said...

Absolutely agree

Unknown said...

Very true !

वृंदा देशपांडे-जोशी said...

बहू हिंडता सौख्य होणार नाहीं
शिणावे परी नातुडे हीत काहीं
विचारे बरें अंतरा बोधवीजे
मना सज्जना राघवीं वस्ति कीजे ॥४१॥

तसं मना सज्जना एकी नोकरी वस्ती कीजे असं म्हणूयात. 👌👌👌👍😊

Pratibhajojarekulthe said...

काय कंटाळा आलाय या नोकरीचा असे कायम ऐकायला मिळते अगदी सध्य परिस्थिवर लिखाण आणि जे काम आपण करतो आहोत त्यावरच निष्ठा ठेउन करावं हे तात्पर्य चांगले

Dr Jayant Baride said...

Like this. Please keep on writing

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...