Sunday, 14 August 2022

अलक

एक सामाजिक संघटना निर्माण झाली.

तिने आपली घटना प्रसिद्ध केली.

ज्यात नमूद केले होते 'समर्थ, सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करण्याचे ध्येय'.

काही समीक्षकांनी खूप आलोचना केली.

पण ती सामाजिक संघटना अनेक वर्षे डळमळीली नाही.

त्यांनी आदर्श बुद्धांच्या तत्वज्ञानाला मानले होते.

त्याप्रमाणे ते कार्य करत होते.

-  बुद्धम् शरणम् गच्छामि. धम्मम् शरणम् गच्छामि. संघम् शरणम गच्छामि...

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...