त्याला दुकानदाराने फसवले आहे, हे त्याच्या लक्षात आले तोपर्यंत त्याने पैसे दिले होते.
त्याला अधिकचे पैसे गेल्याचे दुःख होत नव्हते तर फसवल्या गेल्याचे वाईट वाटत होते.
स्वतःला सावरत तो परत दुकानात गेला. दुकानदाराला वाटले आता हा वाद घालेल.
तो मोठा उद्योजक होता. स्वतःचे कार्ड देत म्हणाला, "कधी काही गोष्टींची गरज पडली तर नि:संकोच फोन कर."
नि दुकानाबाहेर पडत मनातल्या मनात विचार केला,
'मी याला माफ केले नसते तर याने काही दिवस का होईना माझ्या मनात घर केले असते.'
No comments:
Post a Comment