Tuesday, 8 October 2024

अलक ४६५



‘ज्या व्यक्तीच्या माघारी तिच्या विषयी चांगलं बोललं जातं, ती उत्तम व्यक्ती’,

सद् गुरु विषय मांडत होते.

त्यांना भक्तांच्या चेहऱ्यांवर अस्वस्थता जाणवली.

मग त्यांनी लगेचच सोपा मार्ग दाखवला,

‘चांगलं दिसण्यांसाठी मनुष्य जसा प्रयत्न करतो तसां चांगलं असण्यासाठी प्रयत्न करायचा’.

No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...