त्याची आजी नेहमीच चतुर्थी, एकादशी, पौर्णिमा, अमावस्या अशा तिथी सांगतच सगळ्या आठवणी नि घटना सांगायची.
आजीचा त्याच्यात जीव खूप होता.
पण तो नव्या पिढीतला.
व्यावहारिक विचारांतून दिनदर्शिका आणि पंचांगाची सांगड घालून घटना समजावून घ्यायचा.
८१ वर्षांचं जीवन जगून आजी जात राहिली.
तो प्रचंड रडला.
आता त्याला सहस्त्र पौर्णिमा पाहिलेली आजी कोणताही प्रकाश दाखवणार नव्हती.
No comments:
Post a Comment