त्याने बस नेमकीच चालू केली आणि त्याला घरून फोन आला, त्याचे 'वडील गेले' म्हणून.
तो थांबला नाही. त्याने ती बसची फेरी पूर्ण केली.
मग घरी गेला.
वडीलांच्या पर्थिवासमोर हात जोडून उभा राहिला. त्या वेळी वडिलांनी सांगितलेले वाक्य सारखं त्याच्या कानांवर पडत होतं,
'हाती घेतलेले कोणतेही काम कधीच अर्धवट सोडू नकोस'.
No comments:
Post a Comment