"तू साधा चहा सोडू शकत नाहीस. तू काय गाव सोडून परदेशात झेंडा फडकावशील?",
असे म्हणत त्याच्या मित्रांनी त्याला टोमणे मारले.
हुशार विद्यार्थ्यांत कधीही नसणारा तो आता केवळ अथक प्रयत्नांवर परदेशात गेला आहे.
काही वर्षांनी तो गावी परतला.
मित्रांनी आता त्याची स्तुती करत त्याला चहा देऊ केला.
त्यावर तो म्हणाला,
"तुमची आठवण रोज येत राहावी. म्हणून मी चहा केव्हांच सोडला आहे."
No comments:
Post a Comment