Tuesday, 26 July 2022

अलक क्र. ८७


'यशाचं शिखर खूप निसरडं असतं. प्रत्येक पाऊल जपून टाक',

त्याला गुरूंनी उपदेश केला.

आता जवळ जवळ तो गेली २५ वर्ष यशाच्या शिखरावर विराजमान आहे.

त्याने गुरूंना दिलेल्या उपदेशात अपयशी होऊ नये म्हणून उपाय विचारला होता. 

ज्याचे तो तंतोतंत पालन करतो आहे. 

'ज्यांचे सहकार्य, प्रेमामुळे जीवन घडले, त्यांना कधी अंतर देऊ नको.

आणि त्यांच्यासोबत राहत असताना आत्मप्रौढी बाळगू नको.'


No comments:

सासुरवाशीन

अलक ५७८

 तो व्यक्त होत होता. ती आकार घेत होती. काही युगे उलटली.  ती पूर्ण साकारली. नि तो अव्यक्त झाला. एव्हाना त्याला लोकं निर्गुण, निराकार म्हणून स...